अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर, २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी आणि मदतीचे स्वरूप Ativrushti bharpai gr

Ativrushti bharpai gr: राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! शासनाकडून विशेष मदत पॅकेज (Relief Package) जाहीर. पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ₹८,५०० ते ₹२२,५०० पर्यंत मदत, सोबतच रब्बी हंगामासाठी खते-बियाण्यांकरिता अतिरिक्त १०,००० रुपये मिळणार.


मुंबई, दि. ०९ ऑक्टोबर २०२५:

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित करून विशेष मदत पॅकेज व सवलती जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष, सवलती आणि बाधित तालुक्यांची यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या मदतीचे स्वरूप आणि निकष

जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने विविध प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पिकांच्या आणि जमिनीच्या नुकसानीसाठी भरीव मदत:

शेती पिकांच्या नुकसानीसाठी (Crop Loss) ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. यामध्ये, जिरायत पिकांसाठी (Non-irrigated Crops) प्रति हेक्टर ₹८,५००बागायत पिकांसाठी (Irrigated Crops) प्रति हेक्टर ₹१७,०००, तर बहुवार्षिक पिकांसाठी (Perennial Crops) प्रति हेक्टर ₹२२,५०० रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी (Land Damage) देखील तरतूद करण्यात आली आहे. पुरामुळे शेतजमिनीवर गाळ साचला असल्यास तो काढण्यासाठी प्रति हेक्टर ₹१८,००० आणि जमीन खरडून वाहून गेल्यास प्रति हेक्टर ₹४७,००० इतकी मदत दिली जाईल.

जीवितहानी आणि घरपडझडीसाठी आर्थिक आधार:

या नैसर्गिक आपत्तीत दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना ₹४ लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच, घरपडझडीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील केली जाणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरासाठी सपाट भागाकरिता ₹१,२०,००० आणि डोंगराळ भागाकरिता ₹१,३०,००० इतकी मदत मिळेल. घराची अंशता पडझड झाली असल्यास, पक्क्या घरासाठी ₹६,५०० आणि कच्च्या घरासाठी ₹४,००० दिले जातील. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपडीसाठी ₹८,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पशुधन हानीसाठी नुकसान भरपाई:

शेतकऱ्यांचे पशुधन दगावल्यास त्यांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये, प्रत्येक दुधाळ जनावरासाठी (गाय, म्हैस) ₹३७,५००, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी (बैल) ₹३२,०००, लहान जनावरांसाठी (वासरू) ₹२०,००० आणि प्रत्येक शेळी किंवा मेंढीसाठी ₹४,००० रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.

रब्बी हंगामासाठी १०,००० रुपयांची अतिरिक्त मदत

पिकांच्या नुकसानीच्या मदतीव्यतिरिक्त, रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) खते व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १०,००० रुपये याप्रमाणे (३ हेक्टरच्या मर्यादेत) अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल, असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतून सूट

ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (AgriStack) मध्ये नोंदणी होऊन ई-केवायसी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना मदतीसाठी पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही. त्यांना या प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून, त्यांची माहिती जुळत असल्याने डीबीटीद्वारे (DBT) मदत वितरण सुलभ होणार आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे बा2धित तालुक्यांची जिल्हानिहाय यादी:

अ.क्र. जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके
यवतमाळ वणी, झरी-जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभुळगाव (१२ तालुके)
अमरावती धारणी, मोर्शी, चांदुरबाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर (६ तालुके)
वाशिम कारंजा, मानोरा, वाशिम (३ तालुके)
बुलढाणा मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा, चिखली, मोताळा, खामगाव (९ तालुके)
अकोला अकोट, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर, पातूर (५ तालुके)
चंद्रपूर सिंदेवाही, भद्रापूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, ब्रम्हपुरी (१४ तालुके)
वर्धा समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, कारंजा (७ तालुके)
नागपूर सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड (१२ तालुके)
भंडारा भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी (६ तालुके)
१० गोंदिया गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरगाव अर्जुनी, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी (७ तालुके)
११ गडचिरोली गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा (१० तालुके)
१२ सोलापूर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा (११ तालुके)
१३ अहमदनगर कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहमदनगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर (१३ तालुके)
१४ पुणे हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड (७ तालुके)
१५ कोल्हापूर गगनबावडा, चंदगड, पन्हाळा (३ तालुके)
१६ सातारा कोरेगाव, खटाव, माण (३ तालुके)
१७ सांगली तासगाव, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज, वाळवा (८ तालुके)
१८ नाशिक मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला (१५ तालुके)
१९ जळगाव मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर (४ तालुके)
२० नंदुरबार शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी (६ तालुके)
२१ धाराशिव उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर (८ तालुके)
२२ लातूर देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, उदगीर, चाकूर (१० तालुके)
२३ परभणी परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा (९ तालुके)
२४ हिंगोली कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ (३ तालुके)
२५ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री (९ तालुके)
२६ जालना अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद (८ तालुके)
२७ बीड बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी, केज (११ तालुके)
२८ रायगड १५ तालुके
२९ ठाणे ५ तालुके
३० पालघर ७ तालुके

Leave a Comment